❤️🤷‍♂️तेरी बातों में ऐसा उलझा जिया.. 🖊️📖

दरवर्षीप्रमाणे लिखाणाचा आळस यावर्षी पण कंटिन्यू होणार बहुतेक.. कारण शांत असल्यावर मनात असले भन्नाट विचार येतात… वाटतं कि हे संग्राह्य हवं… आणि नेमकं संगणकावर टंकायला बसलं कि शब्दांचं constipation झाल्यासारखं मनात आलेले विचार बाहेर आणण्यासाठी मेंदूला कुंथावं लागतं! स्वयंशिस्त हा कितीही चांगला प्रकार असला तरी ती येईपर्यंत काही उपाय करणे आवश्यक असतेच. 😒

बरं.. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचे दोन परस्परविरोधी चेहरे असतात. 🎭म्हणजे माझ्या मनात कधी एकदम सात्विक, गंभीर किंवा विचारी विचार येतात… तर काहीकाही दिवस मी निव्वळ मिश्कील, मस्तमौला, भद्र-अभद्राच्या पलीकडे जाऊन आगाऊ किंवा अगदी सारकॅस्टिक, अविचारी विचारांचा मालक असतो. अशावेळी समजत नाही कि लिहावं तरी कसं!!! शेवटी जात्यावर बसले की ओवी सुचेल, लिहायला बसले की मूड लागेल… या लॉजिकने लिहायला लागतो. ✒️😔

आता झाले अती, हौस फिटे किती…

मौज ही इतरा, फुकटची जरा…

माझा तर लिहायचा मूड लागलाय बाबा.. तुमच्या गुड-मूड, बॅड-मूडचं काय गुडमूड करायचं ते तुमच्या तुम्ही बघा! आम्ही आपले गद्य-गर्दभच बरे; पद्य-मृगः काही आम्ही या जन्मी तरी होणे नाही!

तर झालं असं… ✍️

आज सकाळी एक जटाधारी बाबा माझ्या स्वप्नात आले. हातात कमंडलु, कपाळावर भस्म, चेहर्‍यावर ऋषि मुनिचं तेज, अगदी स्वच्छ पितांबर, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, आणि अतिशय गोड आवाजात ते मला म्हणाले ”बेटा, ऐसा कब तक आळशी रहोगे, जागो… उधर ब्लॉग का दर्जा इंचा इंचाने खालावत चालला आहे, ऐसे लोग बोल रहे है. ऐसा कबतक हातों पे हात धरके बैठोगे. उठो, ये लो. एक जादूकी छडी..🪄 इसको घुमावो… सब ठीक हो जायेगा.” आणि बाबा स्वप्नातून पांढऱ्या शुभ्र घोड्यांच्या रथातून आकाशाकडे जातांना दिसले. 🛞🛞 😆😆😂

हुश्श, चला तर मग… उठ उठ महाराजा धू त्वरे वदनासी..

आता cache क्लिअर करून, glitches आणि मेमरी लीक्स इरेझ करून आत kernel रि-लोड करायची वेळ झालेली आहे. तेव्हा कुठे फ्रेश नेटवर्क्स एस्टॅब्लिश होतील. 🛜📶

मस्त करमणुक होतेय वाचताना. पण बरंच काही कळत नाहीये असं होतंय का?

बेबी बुमर्स ना समजेल अशा भाषेत टंकाळा ना? आम्ही तंत्रज्ञान मागासवर्गीय. डिकोड करता करता डोस्क्याचं दही होतय बघा. 🥸😁

आऊट डेटेड सॉफ्टवेअर ऑपरेटिंग सिस्टिम डॉस “कृ.बु.”च्या जमान्यात लोडिंग लोडिंगच होणार बॉस! (आख्या मराठीला गिरवी ठेवलास की बे.) (✿◕‿◕✿)

एकदम सर्जिकल स्ट्राईक झाला का? जल्ला भारी लिवतय. डोक्यातला कल्ला, कधी कल्लातर कलतो तर नायतर नुसता कल्ला करतो. 🤯

थोडंसं काहीतरी लिहिलं आहे… कोंबडीने अंडी देत राहावे, आता त्याचे ऑम्लेट करायचे की भुर्जी हे सर्वस्वी आता वाचकांच्या हातात!

🎞️ गुड बॅड अग्ली मधलं वाक्य आठवलं… When you have to shoot, shoot. Don’t talk.

एय्य … कोण आहे रे तिकडे !! हारतुरे, फटाके बिटाके सगळे रेडी ठेवा रे. साहेब लिहिणारेत. (भंकस आवडत नसेल त्यांनी वाचू नये.) 😁🙃

किंमत – Price’Less’ or Priceless 💸

वेगळा विषय आहे आणि खूप व्यक्तिनिरपेक्ष पद्धतीने वाचा. म्हणजे उगाच स्वतःशी किंवा इतर कोणाशी relate वगैरे करत बसू नका. वाचा आणि विचार मात्र नक्की करा यावर.

तुम्हांला किंवा तुमच्या मतांना किती किंमत आहे? निवडणुकीमध्ये नव्हे तर रोजच्या जगण्यातल्या दैनंदिन किंवा महत्वाच्या निर्णयांमध्ये तुम्हांला किंवा तुमच्या मतांना किती किंमत आहे? याचं उत्तर तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा समाजामध्ये तुमचं काय स्थान आहे यावर ठरतंय का? जर तुमच्या जगण्या-वागण्यावर इतरांचे आक्षेप येत असतील तर तुम्ही गरीब आहात. मग काय करायचं यावर? काही करायचं नाही.. आहे तसं राहू द्या सगळं.. नसेल तर मग इतरांसाठी तुम्ही तुमची किंमत वाढवा. श्रीमंत व्हा. Nobody Cares About Your Story Until You Have Money, So Be Rich. कटू आहे पण सत्य आहे… No one will Value your words until you become successful …or rich.

पैशांमध्ये तुमच्या अपयशाला किंवा अपूर्णतेला सुद्धा झाकून टाकायची किंमत आहे..

पैसा किंवा पद असेल तर तुमच्या हरण्याला सुद्धा लोक ‘Still A Nice Try’ म्हणून appreciate करून विसरून जातील. पैसा नसेल तर तुमच्या हरण्याला हेच लोक रोजचे रडगाणे म्हणून तुम्हांला आळशी ठरवतील आणि सपशेल अपयशी ठरवून आयुष्यभर बोल लावतील. आणि तुम्ही जिंकलात तरी तुम्हांला नशीबाने जिंकलात कि काय अशी जाणीव करून देतील.

अगदीच काही कमावता आलं नाही तर तिरस्काराऐवजी प्रेमाने वागायला शिका. म्हणजे किती मुनाफा होईल? यामुळे काय होईल…? नाही ओ शेठ..फार काही होणार नाही. कदाचित लोकांना तुमची किंमत कळणार नाही. पण स्वतःच्या नजरेत तरी तुमची किंमत वाढेल. आणखी यापेक्षा वेगळं काय हवं असतं एखाद्याला आयुष्यामध्ये? 

कोणासाठी जगायचं? त्यांच्यासाठी कि स्वतःसाठी? 🤔

समाज बहुतेक वेळा व्यक्तीच्या संघर्षापेक्षा त्याच्या यशाकडे अधिक लक्ष देतो. एखादी व्यक्ती किती संकटांतून गेली, किती अपयश पचवले किंवा किती त्याग केले याकडे लोकांचे लक्ष नसते. पण जेव्हा तीच व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचते, तेव्हा तिच्या प्रत्येक शब्दाला महत्त्व प्राप्त होते. गरीब किंवा संघर्ष करणाऱ्या व्यक्तीचे सल्ले अनेकदा दुर्लक्षिले जातात. परंतु जेव्हा तीच व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होते किंवा मोठे यश मिळवते, तेव्हा तिचे अनुभव, विचार आणि मते इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. समाजाची ही मानसिकता नवीन नाही. इतिहासातही अनेक महान व्यक्तींना त्यांच्या जिवंतपणी उपेक्षा सहन करावी लागली; पण यश मिळाल्यानंतर त्यांचा गौरव करण्यात आला.

मात्र, याचा अर्थ असा नाही की पैसा हाच सर्वकाही आहे. पैसा आणि यश हे समाजाचे लक्ष वेधून घेण्याचे प्रभावी साधन असू शकतात, परंतु व्यक्तिमत्त्वाची खरी किंमत प्रामाणिकपणा, ज्ञान, दयाळूपणा आणि मानवतेत असते. या प्रवासात स्वतःची मूल्ये आणि तत्त्वे जपणे अधिक महत्त्वाचे असते.

मग अशावेळी लौकिकार्थाने अपयशी लोकांप्रती काय भावना असावी? तुच्छता किंवा अवहेलेनेने वागणे नक्कीच नसावे. यासोबतच आत्मप्रौढी बिलकुल नसावी.. अशावेळी समर्थांच्या दासबोधातल्या ओळी आठवतात – आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार। आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥

वागण्यात साधेपणा यायला हवा. Simplicity is the most Complex thing to achieve. पण प्रयत्न तरी असेच हवेत. माणसाचं वय वाढतं तसं त्याच्यात जरा जास्त शहाणपण यावं अशी अपेक्षा असते.

…पाहिलंत ना? 🧐

हाच माझा प्रॉब्लेम आहे… सुरुवातीला light मूडची शांत आणि रोमँटिक गाणी ऐकता ऐकता कधी माझी प्लेलिस्ट ख्याल, ठुमरी किंवा बंदिशींकडे वळते समजत नाही!! मी म्हटलं ना कि प्रत्येकाच्या स्वभावाच्या दोन परस्परविरोधी बाजू असतात.. त्या ह्या अशाच असाव्यात! 

सर्व रसांचे मिश्रण एकत्रित केले जाऊ नये, हे खरे आहे. पण ते मांडले जाऊच नये हे तितकंसं  बरं वाटत नाही. हं, बटबटीत होणार नाही याची मात्र खबरदारी घ्यायला हवी. ✅

असो.

बुद्धिमान समजुनी भिडू स्वतःला काढुनी घेती आपुली लाज

बुद्धिहीन मानुनी वाचक तयांना पृच्छती शमणार कधी ही खाज

मी टवाळ आहे म्हणून मला विनोद आवडतो, की मला विनोद आवडतो म्हणून मी टवाळ आहे हे माहित नाही.😀 पण सतत अशा दुःखी, गंभीर किंवा निराश मनस्थितीत राहायला मला आवडत नाही.

माझी भूमिका स्पष्ट करतो – माझा हा लिखाणाचा काथ्याकूट म्हणजे कलाकृती नव्हे, डोळ्यांत टच्चकन पाणी आले व हृदय गलबलले वगैरे असलं काही वाटणार नाही. एका पारंपारिक चौकटीत बसणारे हे लेखन नाहीच मुळी. त्यामुळे वाचताना मेंदू सजग ठेवून वाचा… आवडलं तर जब्बरदस्त… (हास्यजत्राफेम कातिल प्रभाकर मोरे ष्टाईलने म्हटलेले) वगैरे सुद्धा म्हणू नका. कारण माझ्या कवितांवर वा लिखाणावर मी प्रेम करत नाही याउलट जसं सहजपणे मी मित्रांशी बोलतो, संवाद साधतो, तितक्याच सहजतेने मी लिहितो. मनापासून आवडलं तर वाहवा जरूर करा. मला वाटतं चांगलं लेखन करणं आणि चांगल्या लेखनाला मनमूराद दाद देणं हा पॉजिटीव अप्रोच आहे. नाही आवडलं तर काय आवडलं नाही तेदेखील सांगा.. टीकाटिप्पणी करा, सल्ला द्या अथवा मार्गदर्शन करा. कारण छिन्नी हातोडीचे घाव ठोके पडल्याविना मुर्ती घडणार नाही. बक्षिशी म्हणून तुम्हांला माझ्याकडून व्हॅनिला स्वादाचा दुग्धशर्करामिश्रीतघनगोलगट्टु मिळेल. 🍨

आणि काहीच नाही समजलं तर…? काय बोलणार यावर? π लागू महात्मन! कितीही खते घातली तरी शेताने अ‍ॅब्सोर्ब केले पाहिजे ना? 🙊

तेव्हा मात्र मग हे सर्व लिखाण श्रीरामार्पणमस्तु!!

(स्वगत) साहेब, आता तुम्ही मौन व्रत धारण करा, काय असत ना व्यक्तीगत अहं वाढला की होत कधी कधी! 🤛

हे काय वाचलंय असा प्रश्न पडलाय का तुम्हांला? हल्ली लिखाण खूपच टिपिकल झालंय, त्यातला खट्याळपणा हरवत चालला आहे. म्हणून जसं मनात आलं तसं लिहिलंय.. बासुंदीच्या वाटीवर कसं हलकं केशर पेरतो ना थोड्या वेळासाठी.. तेवढा वेळ जरी करमणूक झाली तरी हे लिखाण सार्थकी लागलं असं मी म्हणेन..

आषाढी एकादशीची चाहूल लागतेय.. थोड्याच दिवसांत भगव्या पताका घेऊन टाळ गजरांच्या नादात वैष्णवांच्या दिंड्या पंढरीत दाखल होतील 🚩आणि सगळं वातावरण कसं भक्तिमय होऊन जाईल… माझा विठुराया आहेच मुळी चक्रव्यूहा सारखा. भक्त एकदा आत मधे घुसला की त्याचा अभिमन्यू होणार हे नक्कीच.

पुन्हा एकदा ज्ञानोबा-तुकारामांच्या अभंगांची प्लेलिस्ट मोबाईल वर वाजू लागेल…

हा सोहळा देखणा असतो… बऱ्यावाईट गोष्टींसहित येतो आणि सुखावून जातो..

चांगल्याच गोष्टींच्या आठवणी मनात साठवून वाईटसाईट गोष्टी नजरेआड करूयात…

तुकोबाराय म्हणतात,

बोलावे बरे | बोलावे खरे ||

कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||

माझ्या स्वभावानुसार पुन्हा एकदा विषयांतर होऊन सगळ्याच मुद्द्यांची सरमिसळ होतेय खरी पण या वळणाला थोडी चंदनी सुगंधाची चाहूल लागतेय… याच टप्प्यावर थांबतो.. ‘सत्याची खोज’चा शेवट असाच काही होत असावा.

पुन्हा एकदा पंडितजींचे स्वर कानावर येतील….

जातो माघारी पंढरीनाथा

तुझे दर्शन झाले आता

तुझ्या नादाने पाहीली

ही तुझीच रे पंढरी….

॥ जय हरी विठ्ठल ॥

कधीकधी स्वभावात शुष्कता येत असते किंवा कधीतरी तुम्ही अतिशय संवेदनशील बनता आणि जगण्यातल्या प्रत्येक अनुभवाची असोशीने ओळख करुन घेता आणि तुमच्यात असलेल्या प्रतिभेने त्या अनुभवांचा पट उलगडता. हाच पट सुजाण वाचकांच्या नजरेखालून जावा एवढीच अपेक्षा..

काय? शीर्षक पाहून काय अपेक्षा वाढून बसल्या होत्या?

पुलाव, बिर्याणीच्या नावाखाली वरणभात खाऊ घातला का? 😂😂

त्यासाठीच तर शीर्षक तसे ठेवले ना राव!

पुन्हा भेटूच..

( गाजर-ए-कोबीचा फॅन )

  • राहुल
  • २४.०६.२०२६

Comments

StevenGrade
June 24, 2026 at 3:16 am

Одним из главных преимуществ ЖК Веспер на Шаболовке является его расположение рядом с метро и крупными транспортными магистралями. Это позволяет существенно экономить время на ежедневных поездках по городу, https://vesper-shabolovka.ru/



SamuelSon
June 24, 2026 at 10:51 am

Снять яхту Адлер можно для романтической прогулки на закате. Такой формат отдыха пользуется большой популярностью благодаря особой атмосфере и красивым видам на побережье: прокат яхт в Адлере



June 24, 2026 at 11:57 am

Народ у кого школьники Домашка на весь вечер Никакого интереса к знаниям Короче, нашли идеальное решение — онлайн обучение для школьников с любого возраста Никаких школьных драм В общем, сохраняйте себе — школа онлайн в россии https://shkola-onlajn-lzn.ru Хватит мучить себя и ребёнка Перешлите другим родителям



Brandonbeilt
June 25, 2026 at 12:48 am

The online casino industry has become highly competitive, encouraging operators to improve their services and provide a better experience for their users: https://casinogoldenbet.co.uk/



Leave a Reply

Your email address will not be published.